Saturday, 26 November 2011

एक पुरातन माधवी . . .

एक पुरातन माधवी

महाभारताच्या उद्योगपर्वात ही माधवी भेटते. धर्मसत्तेच्या पाशात अडकून केवळ एक वस्तू म्हणून इथून तिथे फेकली गेलेली. विश्वामित्राला गुरुदक्षिणा द्यायची म्हणून गालव काय गुरुदक्षिणा हवी विचारतो, आणि संतप्त विश्वामित्र ८०० श्यामकर्ण श्वेत अश्व मागतो.  ते अश्व मागायला गालव ययातिकडे जातो पण ययातिकडे ८०० अश्व नसतात. पण याचकाला विन्मुख पाठवायचं नाही म्हणून तो स्वत:ची उपवर मुलगी, माधवी, गालवाला देतो आणि सांगतो, जो तुला ८०० श्यामकर्ण श्वेत अश्व देईल त्याला माझी कन्या अर्पण कर आणि तू गुरुऋणातून मुक्त हो.  मग गालव तिला घेऊन प्रत्येक राजाकडे अश्व मागायला जातो, परंतु एकत्र ८०० अश्व त्याला कुठेच मिळत नाहीत. मग प्रत्येकी २०० अश्वांच्या मोबदल्यात माधवी अनुक्रमे हर्यश्व, दिवोदास आणि उशीनर या राजांकडे एकेक वर्ष राहते आणि प्रत्येकापासून एकेक पुत्र प्रसवते. पुन्हा २०० अश्वांचा प्रश्न उरतोच, तेव्हा विश्वामित्र तिला वर्षभर स्वत:पाशी ठेवतात आणि त्यापासूनही ती एक पुत्र प्रसवते.


आता प्रश्न येतो तो हे नक्की काय होतं ? कारण जर हे स्त्रियांचं उदात्तीकरण (sublimation) आहे तर एक उपभोग्य वस्तू म्हणून तिचा झालेला वापर कसा नाकारता येईल?

त्या काळात स्त्रियांचं स्थान जनमानसांत नक्की काय होतं यावर ही कथा प्रकाश टाकते. आणि याहून संतापाची गोष्ट अशी की एवढ्यावरच तिचे दुर्दैव संपल नाही. तिची देवाणघेवाणही झाली. म्हणजे फक्त उपभोग (exploit) न घेता देवाणघेवाणही (exchange) झाली. त्या  प्रत्येकाकडून तिला एकेक पुत्रही झाला. पण या सगळ्यात आपल्या तथाकथित भारतीय संस्कृतीत असलेली योनिशुचितेची महत्ता (magnitude) कुठे गेली?

कोण उत्तर देईल या प्रश्नाचं ?



प्राक्तन पाटील




No comments:

Post a Comment