Wednesday, 6 June 2012


Social Media


social media एखाद्याची visibility अधोरेखित करतो. लोक techno savvy असोत व नसोत पण ते social website मधे गुंतलेले जरुर असतात. दोघांमधे संवाद असो व नसों पण social वेबसाइट वर व्यक्त (express) होणं हि गरज झालीये. facebook, orkut, twitter हि काही नामांकित नावं. ibibo, desi adda हे देशी brands. आता या websites वर जाऊन काय करायचं काय तर तिथे काही applications असतात. त्यात log in केलं कि इतरांना कळत कि तुम्ही कुठे गेला होतात आणि काय काय केलंत. अनेक applications असतात ज्यातून बराच काय काय कळत जातं. आणि असे hits पण बरेच येतात कि xyz was in Oberoi, abc visited KFC वगैरे वगैरे. 
यामुळे फक्त तुमची virtual visibility दिसते. कशासाठी आहे हि virtual visibility ची गरज? लोकांना सतत कशात तरी गुंतवून ठेवणं हाच आहे पाया social media चा. आता एवढा visible राहण्याचा अट्टाहास कशासाठी असेल? कारण आज reality पेक्षा virtual reality ला जास्त महत्व आहे. Rat race मध्ये पळणारे आपण सगळे गळेकापू (cut throat) स्पर्धेला हि तोंड देतोय. त्यामुळे आजच्या काळात टिकून राहायचं असेल तर virtual visibility आणि virtual reality ला पर्याय नाही. कारण ' जो दिखता है वही बिकता है ' या न्यायाने प्रत्येक माणूस एक marketing product आहे. जे multi-talented किंवा multi-taskers आहेत ते उत्तम marketing mix आहेत. फक्त अपेक्षा सांगा, करून मिळेल. Show yourself to market yourself हाच आजचा मंत्र आहे. म्हणूनच या virtual visibility आणि social media चा बाऊ केला जातोय. 
यात एक मोठी गोम आहे. हे सगळे applications फक्त भारी भारी phones वरच चालतात, म्हणजे Blackberry , Android आणि Apple I phone . कारण target clientele जे आहे ते elite (economic) class मध्ये मोडतात. कारण ज्या गोष्टींची applications बनवली जात आहेत त्या वस्तू प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ Audi cars . एक  application पाहिलं ज्यात तुमच्या screen वर एक Audi car दिसते जी वजनाने सर्वात हलकी असल्याची जाहिरात करायची आहे. तर या application मध्ये ती car दिसल्यावर तुम्हाला तुमच्या mic मध्ये फुंकर घालायची आहे. जेवढी जोरात फुंकर घालाल तेवढी ती car पुढे जाईल. आहे कि नाही मजा ? 
आता  हि गाडी सर्वसामान्यांना परवडणारी नाहीच. मग जाहिरातीत एवढी दणदणीत रक्कम मोजण्याचं कारण काय? आहे. जे target clientele आहे ते हि किंमत देऊ शकतात आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप केला जातोय. 

Friday, 1 June 2012

वार करणाऱ्या तलवारीची धार मोठी कि ती तलवार पेलणारा हात मोठा? त्या प्रमत्त हातातली ताकद मोठी कि त्या हातांमागच भेदरलेलं मन? काहीही असो, सगळ्यांची शेवटी मातीच होते. ज्याप्रमाणे नद्या गोड असूनही समुद्र खारटच असतो. कारण समुद्र साचलेला असतो. तो आपला खारटपणा नद्यांना घ्यायला भाग पाडतो. मग आपण त्या प्रवाहाला खाडी म्हणतो. खारट म्हणून खाडी कि खारट म्हणून अढी?

मनातली अढीच पण अशीच असते ना? लादलेल्या गोष्टींची अढी बनते. मग कालांतराने तिला पीळ पडत जातात. ती अढी दुस्तर बनून बसते. उजीच म्हणतात कि सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही. कसा सुटेल पीळ? पीळ पडायला जितका वेळ गेला त्याच्या दुप्पट वेळ सुटायला द्यावाच लागेल. अथवा पीळ पडूच देऊ नका. पीळ किंवा अढी फोडायचा प्रयत्न करा. प्रश्न सुटतील किंवा निदान उग्र तरी होणार नाही. आणि त्यांना तोंड हि द्यावं लागणार नाही. 

छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण हवा लागते आणि अढीचा गंज लागतो. मग किती वेळ लागतोय पीळ पडायला? सुरुवातीचा पीळ पडला कि पुढचे पीळ आपोआपच पडतात. नवीन पीळ जितके जास्त तितका जुना पीळ जास्त घट्ट. सोडवू म्हटलं तरी सुटत नाहीत.  

मन

मन भरकटल कि फिरतच राहतं. गालिब पण म्हणून गेलाय ए- दिल - ए - नादान तुझे हुआ क्या है... कुठे तरी लांब निघून जातं. पकडू म्हटलं तरी मुठीत येत नाही. आपण म्हणतो कि तंद्री लागलीये, पण ज्याचं भरकटल तोच जाणे ती व्यथा. कळत असतं पण वळत नसतं, कारण मनाचा वारू भटकत असतो. त्यावर आपला जोर मुळीच नसतो. आणि मन म्हणजे काट्यात गुंतलेला पदर हि नव्हे, जो अलगद सोडवून घेता येईल. ते गुंततच जातं, कळत नकळत. पुरात गटांगळ्या खाल्ल्यावर जी अवस्था होते तीच इथेही होते. पूर तुला बुडवायला बघतो अन मन? मनाकडे अश्या युक्त्यांचा खजिना असतो. पुरातली धडपड दिसते पण मनाविरुध्ह चाललेलं द्वंद्व नाही दिसू शकत. आपणच स्वत:शी लढत असतो आणि आपणच धारातीर्थी पडतो. नेहमीच. कारण मनाला आपलं वर्म ठाऊक असतं. कुठला घाव कुठे घालावा हे जाणण्यात मनाएवढा वाकबगार कोणी हि नसतो. 

अखेर विजय हि मनाचाच होतो. आपण हरणार युध्द लढत असतो. तरी कुठे तरी हरून ही आपण जिंकत असतो.