Monday, 17 October 2011

कर्ण

दाता म्हणून प्रसिद्ध पण याचक म्हणून नेहमीच ओंजळ रिकामी असणारा. ओंजळच काय, मनातले भाव सोडले तर सगळच रिक्त होतं. जन्मदात्या आईने झिडकारलं, जगाने सूतपुत्र म्हणून हिणावलं.
    " माझ्या आयुष्याच्या निर्णायक क्षणी माझी आई, अंह राधाई नव्हे, जन्मदात्री आई, कुंती, माझ्याकडे आली आणि मागितलं तर काय, माझ्या पुत्रांना जीवनदान दे. मग मी कोण ? मी वचन दिलं होतं दुर्यधनाला, अर्जुनवधाचं. आता मी दोन्ही बाजूंनी बांधला गेलो होतो. म्हणून मी सांगितलं, उद्या सूर्यास्तापर्यंत पाचच पांडव जिवंत असतील, मी सोडून किंवा अर्जुन सोडून. "
      त्यावेळी कर्णाच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? एकीकडे आई भेटल्याचा आनंद तर दुसरीकडे तिचे अन्य सहोदरांवरील प्रेम पाहून त्याचं मन तर प्रेमाला पारखंच राहीलं असेल.
    "  मी तर नेहमीच परका राहीलोय. एक दुर्यधनाची मैत्री सोडली तर माझ्या आयुष्यात काहीच उरत नव्हतं. म्हणूनच तो चूकत असतानाही मी पूर्ण विचारपूर्वक त्याची बाजू घेतली. मी दाता म्हणून प्रसिद्ध असलो तरि एक याचक म्हणून मी नेहमीच रिक्त हस्ते परतलोय. "






* आपल्या सगळ्याच्या मनात कर्ण दडलेला असतो. मी प्रयत्न केलाय माझ्या मनातल्या कर्णाला न्याय देण्याचा.

No comments:

Post a Comment